मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह असे म्हणतात: पाहा! एक गरुड आकाशातून खाली झेप घेत आहे, मोआबभूमीवर आपले पंख पसरवित आहे.

  2. मोआब एक राष्ट्र म्हणून न राहता तिचा नाश होईल. कारण तिने याहवेहविरुद्ध उर्मटपणा केला आहे.

  3. हे मोआबातील लोकांनो, दहशत, खड्डे व पाश तुझ्या वाट्याला येतील, असे याहवेह म्हणतात.

  4. “जो कोणी दहशतीपासून दूर पळेल तो खड्ड्यात पडेल, जो कोणी खड्ड्यातून बाहेर पडेल, तो पाशात सापडेल. कारण मी मोआबावर तिच्या शिक्षेचे वर्ष आणणार आहे. याहवेह असे जाहीर करतात.

  5. “परंतु मी मोआबच्या समृद्धीची येत्या दिवसात पुन्हा भरपाई करेन,” असे याहवेह म्हणतात. मोआबाच्या न्यायाचे भाकीत येथे संपते.

  6. अम्मोनी लोकांविषयी: याहवेह असे म्हणतात: “इस्राएलला पुत्र नाहीत काय? इस्राएलला वारस नाहीत काय? अम्मोनी राजाने गादचा ताबा का घेतला आहे? त्याचे लोक त्यांच्या नगरात का राहत आहेत?

  7. याहवेह जाहीर करतात, असे दिवस येत आहेत, जेव्हा मी अम्मोन्यांच्या राब्बाह नगराविरुद्ध रणगर्जना करेन, ते नासाडीचा ढिगारा होईल, आणि त्याच्या सभोवतीची सर्व गावे जाळून टाकली जातील. मग इस्राएली येईल आणि आपला देश तुमच्याकडून परत घेतील. मग ज्यांनी इस्राएलला हाकलून लावले, त्या सर्वांना ती हाकलून लावेल.” असे याहवेह म्हणतात.

  8. तुझ्या सर्व बाजूने मी तुझ्यावर भयंकर अनर्थ आणेन, असे प्रभू, सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. तुझ्यातील प्रत्येकजण देशोघडीला लागेल, त्या फरारी लोकांना एकत्र करण्यास तिथे कोणीही नसेल.

  9. “परंतु नंतर मी अम्मोन्यांच्या समृद्धीची भरपाई करेन,” याहवेह जाहीर करतात.

  10. एदोम्यांविषयी: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “तेमान प्रांतात आता शहाणपणा राहिलेला नाही का? शहाण्या मनुष्यातून बोध नाहीसा झाला आहे काय? त्यांच्यातील समंजसपणा क्षय पावला आहे काय?

  11. ददान प्रदेशातील रहिवाशांनो, मागे वळा व पलायन करा, खोल गुहेत जाऊन लपा, कारण मी जेव्हा त्याला शिक्षा करेन, तेव्हा मी एसावावर अरिष्ट आणेन.

  12. परंतु मी एसावला पूर्णपणे विवस्त्र करेन; मी त्याची लपण्याची ठिकाणे उघडी करेन, म्हणजे तो स्वतःला गुप्त ठेऊ शकणार नाही. त्याचे शस्त्रधारी पुरुष, तसेच त्यांचे मित्रगण व शेजारीदेखील नष्ट झाले आहेत, म्हणून तिथे असे म्हणणारा कोणीही राहिलेला नाही,

  13. ‘तुझ्या पितृहीन मुलांना माझ्याकडे ठेव; मी त्यांना जिवंत ठेवेन. आणि तुझ्या विधवाही माझ्यावर विसंबून राहू शकतात.’ ”

  14. याहवेह असे म्हणतात: “जे हे पेय पिण्यास पात्र नाहीत त्यांनी ते प्यालेच पाहिजे, तुम्हाला शिक्षा का होऊ नये? तुम्ही शिक्षा भोगलीच पाहिजे, तुम्ही ते प्यालेच पाहिजे.

  15. याहवेह जाहीर करतात, मी माझ्या नावाची शपथ वाहून म्हणत आहे, बस्रा उद्ध्वस्त व शापित होईल, ते दहशत व उपहासाचा विषय बनतील; आणि त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.”

  16. मी याहवेहकडून हा संदेश ऐकला आहे; “एदोमावर हल्ला करण्यास एकत्र या! युद्ध करण्यास सज्ज व्हा!” असे सर्व राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला होता.

  17. “आता राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन व सर्व मानवजात तुमचा तिरस्कार करतील.

  18. तुम्ही दहशतीस दिलेले प्रोत्साहन आणि तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता, तुम्ही ज्यांनी डोंगरावरील उच्च स्थाने व्यापली आहेत. जरी तुम्ही तुमची घरटी गरुडांच्या घरट्यांप्रमाणे उंच बांधली आहेत, तरी तिथून मी तुला खाली आणेन. असे याहवेह जाहीर करतात.

  19. याहवेह जाहीर करतात जसा सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश झाला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही; त्यात लोक वस्ती करणार नाहीत.

  20. “यार्देन नदीच्या झुडूपातून सुपीक कुरणात झेप घेणार्‍या सिंहाप्रमाणे, एदोमच्या लोकांना त्यांच्या भूमीवरून मी एका क्षणात पळवून लावेन. मी नियुक्त करावे असा या कार्यासाठी कोण निवडलेला आहे? माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मला चेतावणी करणारा कोण आहे? कोणता मेंढपाळ माझ्याविरुद्ध उभा राहील?”

  21. एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. तेमानमध्ये राहणार्‍या लोकांविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.

  22. जी नगरी मला प्रसन्न करते, त्या प्रसिद्ध नगरीस टाकून देण्यात का आले नाही?

  23. निश्चितच तुझे तरुण रस्तोरस्ती मरून पडतील; तुझे सर्व सैनिक त्या दिवशी निःशब्द केल्या जातील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  24. “आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन व तो अग्नी बेन-हदादचे राजवाडे जाळून टाकील.”

  25. केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी: याहवेह असे म्हणतात: “सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा.