Parables बद्दल बायबलमधील वचने: Of the vine
Of the vine बद्दल वचने
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
“मानवपुत्रा, द्राक्षवेलीचे लाकूड व वनातील इतर झाडांच्या फांद्यांमध्ये काय फरक आहे?
काही उपयोगी वस्तू बनवण्यासाठी तिचे लाकूड कधी घेतले गेले काय? वस्तू टांगून ठेवण्यासाठी लोक तिच्या खुंट्या बनवतात काय?
आणि जेव्हा तिला अग्नीत टाकले जाते व तिचे दोन्ही टोक जळून जातात आणि मधला भाग भस्म होतो, तेव्हा ते कोणत्या कामास योग्य असतात?
ती संपूर्ण असता कोणत्याही कामास येत नाही तर, अग्नीत जळून भस्म झाल्यावर कोणती उपयोगी वस्तू बनवण्यास ती कामास येईल?
“म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जसे मी द्राक्षवेलीच्या लाकडाला वनातील इतर झाडांबरोबर अग्नीचे इंधन म्हणून दिले आहे, त्याचप्रमाणे यरुशलेमात राहणार्या लोकांशी मी वागेन.
मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन. जरी ते अग्नीतून बाहेर आले, तरीही अग्नी त्यांना संपुष्टात आणेल. आणि जेव्हा मी आपले मुख त्यांच्यापासून फिरवेन, तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.
ते अविश्वासू आहेत म्हणून मी त्या देशाला ओसाड करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.”
“ ‘त्याने देशातील एक रोप घेतले आणि ते सुपीक भूमीत लावले. त्याने ते वाळुंजीप्रमाणे भरपूर पाण्याजवळ लावले,
आणि ते फुटले, पसरट व कमी उंचीची वाढून द्राक्षवेल झाली. तिच्या फांद्या त्या गरुडाच्या दिशेने वळल्या होत्या, परंतु तिची मुळे तिच्याच खाली होती. ती एक द्राक्षवेल झाली आणि तिला पानांनी भरलेल्या फांद्या आल्या.
“ ‘परंतु अजून एक मोठा गरुड आला, ज्याचे शक्तिशाली पंख आणि भरलेला पिसारा होता. द्राक्षवेलीने आता आपली मुळे ती जिथे लावली होती तिथून त्या गरुडाकडे पसरविली आणि पाण्यासाठी आपल्या फांद्या त्याच्याकडे लांब केल्या.
त्या द्राक्षवेलीला पाने आणि फळ यावे व ती एक उत्कृष्ट द्राक्षवेल व्हावी म्हणून भरपूर पाणी असलेल्या चांगल्या भूमीत ती लावली गेली होती.’
“त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तिची भरभराट होईल काय? ती वाळून जावी म्हणून तिचे फळ काढून घेऊन तिला मुळापासून उपटले जाईल काय? तिची सर्व नवीन पालवी वाळून जाईल. तिला समूळ उपटण्यासाठी ना मजबूत हात लागणार ना पुष्कळ लोकांची गरज लागणार.
तिला लावले तर आहे, पण तिची भरभराट होईल काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती पूर्णपणे वाळून—ज्या ठिकाणी वाढली त्याच ठिकाणी ती वाळणार नाही काय?’ ”
“ ‘तुमची आई तुमच्या द्राक्षमळ्यात पाण्याजवळ लावलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे होती; विपुल पाण्यामुळे ती फलदायी व फांद्यांनी भरलेली होती.
तिच्या फांद्या मजबूत असून, अधिकार्याच्या राजदंडासाठी योग्य होत्या. झाडाच्या दाट पानांच्या वर त्या उंच वाढल्या, तिची उंची व तिच्या पुष्कळ फांद्यांमुळे ती उल्लेखनीय दिसत होती.
परंतु क्रोधामुळे ती समूळ उपटली जाऊन जमिनीवर फेकण्यात आली. पूर्वेकडील वार्याने ती वाळून गेली, तिची फळे गळून पडली; तिच्या मजबूत फांद्या वाळून गेल्या आणि अग्नीने त्या भस्म केल्या.
आता ती वेल वाळवंटात, कोरड्या व तहानेल्या भूमीवर लावली आहे.
तिच्या एका मुख्य फांदीमधून अग्नी पसरला आणि तिचे फळ भस्म केले. अधिकार्याच्या राजदंडासाठी योग्य अशी एकही मजबूत फांदी तिच्यावर राहिली नाही.’ हे विलापगीत आहे आणि विलापगीत म्हणूनच त्याचा उपयोग व्हावा.”