Death बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“कधीच नाही!” योनाथानने उत्तर दिले. “तू मरणार नाहीस! माझा पिता कोणतेही काम; लहान किंवा मोठे, ते मला सांगितल्याशिवाय करीत नाही. तर ते माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवतील? हे खरे आहे ना!”
परंतु दावीदाने शपथ घेतली आणि म्हणाला, “तुझ्या पित्याला चांगलेच माहीत आहे की, मी तुझ्या दृष्टीत कृपा पावलो आहे आणि ते स्वतःशी म्हणाले आहेत, ‘योनाथानला हे माहीत होऊ नये नाहीतर तो दुःखी होईल.’ तरीपण जिवंत याहवेहची व तुझ्या जिवाची शपथ की, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये फक्त एका पावलाचे अंतर आहे.”
कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे आहे आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध मी जे काही बोललो ते तू ऐकले; की ते शापित होऊन ओसाड पडतील, तेव्हा तू स्वतःला नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात.
म्हणून मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ” तेव्हा त्यांनी परत जाऊन तिचे उत्तर राजाला सांगितले.
तिथे बंदिवान देखील स्वस्थ असतात, कारण तिथे गुलामाच्या अधिकार्याचे ओरडणे ऐकू येत नाही.
लहान आणि मोठे तिथे असतात, आणि गुलाम आपल्या धन्यापासून मुक्त झालेले असतात.
जे मला आता पाहतात ते मला आणखी पाहणार नाहीत; तुम्ही मला शोधाल पण मी अस्तित्वहीन असेन.
ढग जसे विरळ होऊन नाहीसे होतात, त्याचप्रमाणे जो कबरेत जातो तो कधीही परत येत नाही.
तो आपल्या घरी परत कधीही येणार नाही; त्याचे वसतिस्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही.
म्हणजे जिथून परत येणे होत नाही, जे अंधार आणि मृत्यूचे स्थान, अशा ठिकाणी जाण्यापूर्वी,
जे मध्यरात्रीच्या काळोखासारखे आहे, तिथे गाढ अंधकार व अव्यवस्था आहे, आणि तेथील प्रकाश सुद्धा अंधकारासारखा असतो.”
“झाडाला देखील आशा असते: की त्याला कापून टाकले तरी ते पुन्हा फुटणार, आणि त्याच्या नवीन फांद्या कोमेजणार नाहीत.
मातीत त्याची मुळे जुनी झाली असली, आणि त्याचा बुंधा मातीत मृत झाला असला,
तरी पाण्याच्या सुगंधाने ते फुलते आणि रोपट्याप्रमाणे, त्याला पुन्हा कोंब फुटतात.
परंतु मनुष्य मरण पावतो व त्याला पुरले जाते; तो आपला शेवटचा श्वास घेतो आणि नाहीसा होतो.
जसे सरोवराचे पाणी आटते किंवा नदीचे पात्र आटून कोरडे होते,
तसा मनुष्य पडल्यावर पुन्हा उठत नाही; आकाश नाहीसे होईपर्यंत लोक पुन्हा उठणार नाहीत, ते झोपेतून जागे केले जाणार नाहीत.
जल पाषाण झिजवून टाकते व पूर माती वाहून नेतो, त्याचप्रमाणे तुम्ही मानवाची आशा नष्ट करता.
तुम्ही एकदाच मानवावर प्रबळ होता आणि तो नाहीसा होतो; तुम्ही त्याचा चेहरा बदलता आणि त्याला दूर पाठवून देता.
जरी त्याच्या संतानाचा सन्मान झाला, तरी त्याला ते माहीत नसते; किंवा त्यांना नीच करण्यात आले, तरी ते त्याला दिसत नाही.
ज्या घराची मी आशा धरतो, ती जर कबर आहे, अंधकाराच्या राज्यात जर मी माझे अंथरूण पसरेल,
जर कुजण्याला, ‘तू माझा पिता आहेस’ असे म्हटले आणि किडण्याला, ‘माझी आई’ किंवा ‘माझी बहीण’ म्हणेन,
“पुरातन काळापासूनची वस्तुस्थिती आणि मानवाची पृथ्वीवर उत्पत्ती झाली, तेव्हापासूनच्या गोष्टी तुला खचित माहीत आहेत,
की दुष्टाचा उल्हास हा अल्पकालीन आहे, देवहीन व्यक्तीचा आनंद क्षणभंगुर आहे.
“तरी दुष्टांचा दिवा कितीदा विझला जातो? आणि कितीदा त्यांच्यावर विपत्ती येते, परमेश्वर त्यांच्यावर आपला क्रोध कितीदा आणतात?