Or Lots, the Feast of Purim बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षाच्या निसान महिन्यात, हामानाच्या समक्षतेत, योग्य दिवस व महिना कोणता हे ठरविण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकण्यात आल्या. चिठ्ठ्यांद्वारे या कामासाठी बारावा, अदार महिना निवडण्यात आला.
आता हामान अहश्वेरोश राजास म्हणाला, “सर्व प्रांतात एका विशिष्ट जातीचे लोक विखुरलेले आहेत, जे स्वतःला इतरांपासून वेगळे ठेवतात. त्यांचे रीतिरिवाज इतर लोकांपासून भिन्न आहेत, हे लोक राजाचे कायदे पाळत नाहीत; म्हणून या लोकांचे असे वागणे सहन करणे राजाच्या हिताचे नाही.
जर हे राजास योग्य वाटले तर, या लोकांचा नाश करण्याची राजाज्ञा देण्यात यावी, म्हणजे दहा हजार तालांत चांदी मी स्वतः राजाच्या खजिन्यात भरेन.”
तेव्हा राजाने आपल्या बोटातील मुद्रा काढून ती यहूद्यांचा शत्रू, अगागी लोकातील हम्मदाथाचा पुत्र हामानाच्या स्वाधीन केली.
राजा हामानाला म्हणाला, “पैसे तुझ्याजवळच ठेव व या लोकांचे तुला योग्य वाटेल तसे कर.”
नंतर पहिल्या महिन्याच्या तेराव्या दिवशी राजाच्या चिटणीसांना हजर राहण्याचा हुकूम करण्यात आला. त्यांनी साम्राज्यातील प्रत्येक प्रांतात व सर्व भाषेतून निरनिराळ्या राज्यपालांना आणि अधिकार्यांना हामानाच्या राजाज्ञेचा मजकूर लिहून घेतला. जी पत्रे लिहिलेली होती त्यांच्यावर अहश्वेरोश राजाच्या नावाने राजमुद्रेची मोहर लावण्यात आली.
मग ती पत्रे साम्राज्याच्या सर्व प्रांतांकडे संदेशवाहकांच्या हस्ते पाठविण्यात आली. त्या पत्रांमध्ये अशी राजाज्ञा होती की, तरुण व वृद्ध, स्त्रिया व मुले अशा सर्व यहूदी लोकांना—एकाच दिवशी, बारावा महिना, अदार महिन्याच्या तेरा तारखेस ठार करण्यात यावे आणि त्यांच्या मालमत्तेची लूट करणार्यात यावी.
या राजाज्ञेचा उतारा प्रत्येक प्रांतात कायदा म्हणून जाहीर केला जावा आणि प्रत्येक राज्यातील रहिवाशास त्याची माहिती दिली जावी, म्हणजे नेमलेल्या दिवशी आपले कर्तव्य करण्यास ते तयार राहतील.
राजाज्ञा प्रथम शूशन शहरात जाहीर करण्यात आली, मग ती घेऊन संदेशवाहक निघाले. राजा आणि हामान मद्याची मौज लुटण्यास बसले, पण शूशन शहरात गोंधळ पसरून गेला.
हे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी घडले, मग चौदाव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला.
परंतु शूशन शहरातील यहूदी तेराव्या व चौदाव्या दिवशी एकत्र आले व पंधराव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली आणि हा दिवस मेजवान्या व आनंद करून साजरा केला.
आणि म्हणूनच नगराच्या ग्रामीण भागातील यहूदी लोक अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी आनंद करून व एकमेकांना भेटी देऊन उत्सव साजरा करतात.
कारण अगागी हम्मदाथाचा पुत्र हामान, यहूद्यांच्या शत्रूने सर्व यहूदी लोकांचा विध्वंस करून नाश करण्यासाठी पूर (चिठ्ठ्या) टाकून कट केला होता.
या कटाचे प्रकरण राजापुढे आले, तेव्हा राजाने फर्मान काढले की यहूदी लोकांविरुद्ध रचलेला हामानाचा कट त्याच्याच डोक्यावर उलटविण्यात यावा आणि मग हामान व त्याचे पुत्र यांना फासावर लटकविण्यात यावे.
(म्हणून या दिवसांना पूर वरून “पुरीम” हे नाव पडले.) जे घडले त्या सर्वांची या पत्रात नोंद करण्यात आली, कारण जे काही घडले व जे सर्व त्यांनी बघितले होते.
दरम्यानच्या काळात, अबीहाईलची कन्या एस्तेर राणीने व यहूदी मर्दखयासह आपल्या पूर्ण अधिकाराने पुरीमची सूचना देण्यासाठी दुसरे पत्र लिहिले.
याशिवाय, यहूदी मर्दखयाने अहश्वेरोश राजाच्या साम्राज्यातील सर्व एकशे सत्तावीस प्रांतातील यहूद्यांना सदिच्छा व्यक्त करणारी पत्रे पाठविली.
एस्तेर राणी व यहूदी मर्दखयाने यांनी पुरस्कृत केलेल्या पुरीम सणाचे हे दोन दिवस वार्षिक सण म्हणून साजरे करण्याचे फर्मान काढले, ज्याप्रकारे राष्ट्रीय उपासाचा आणि प्रार्थनेचा सण पाळल्या जातो, त्याच प्रकारे पुरीमचा सणही पाळण्यात यावा.
अशा रीतीने एस्तेरच्या आज्ञेने या दोन दिवसांच्या तारखा निश्चित करण्यात झाल्या आणि ग्रंथात त्यांची नोंद झाली.