Vine बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
“मग ते वृक्ष द्राक्षवेलास म्हणाले, ‘ये आणि आमचा राजा हो.’
“परंतु द्राक्षवेलाने उत्तर दिले, ‘केवळ इतर वृक्षांवर हलतडुलत राहण्यासाठी दैवत व मनुष्यांना आनंदित करणारा द्राक्षारस देण्याचे मी सोडून द्यावे का?’
तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली; इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले.
तुम्ही जमिनीची मशागत केली व ती नांगरली; या वेलीने मूळ धरले व समस्त भूमी व्यापून टाकली.
मजबूत गंधसरू व तिच्या फांद्यांच्या सावलीने पर्वतदेखील झाकले गेले;
त्या फांद्या समुद्रापर्यंत, तसेच फरात नदीपर्यंत पसरत गेल्या.
तुम्ही त्याचे तट का मोडून टाकले, म्हणजे येणारे जाणारे सर्वजण त्याचे द्राक्ष तोडतील?
रानडुकरे त्याला गिळंकृत करत आहेत, आणि भूमीतील कीटकांचा ते आहार झाले आहेत.
हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमच्याकडे परत या! स्वर्गातून खाली दृष्टी लावा! या द्राक्षवेलीची काळजी घ्या.
मी ती जमीन उजाड करेन, तिथे छाटणी किंवा नांगरणी करणार नाही, आणि तिथे कुसळे व काटेरी झुडपे वाढतील. मी ढगांना आज्ञा देईन की, त्यांच्यावर पाऊस पाडू नका.”
मी तुम्हाला एका उत्तम द्राक्षवेलीप्रमाणे लावले होते उत्कृष्ट व विश्वसनीय असे खोड दिले होते. मग तुम्ही माझ्याविरुद्ध का झालात भ्रष्ट व रानटी लता का झालात?
आणि ते फुटले, पसरट व कमी उंचीची वाढून द्राक्षवेल झाली. तिच्या फांद्या त्या गरुडाच्या दिशेने वळल्या होत्या, परंतु तिची मुळे तिच्याच खाली होती. ती एक द्राक्षवेल झाली आणि तिला पानांनी भरलेल्या फांद्या आल्या.
“ ‘परंतु अजून एक मोठा गरुड आला, ज्याचे शक्तिशाली पंख आणि भरलेला पिसारा होता. द्राक्षवेलीने आता आपली मुळे ती जिथे लावली होती तिथून त्या गरुडाकडे पसरविली आणि पाण्यासाठी आपल्या फांद्या त्याच्याकडे लांब केल्या.
त्या द्राक्षवेलीला पाने आणि फळ यावे व ती एक उत्कृष्ट द्राक्षवेल व्हावी म्हणून भरपूर पाणी असलेल्या चांगल्या भूमीत ती लावली गेली होती.’
“त्यांना सांग, ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: तिची भरभराट होईल काय? ती वाळून जावी म्हणून तिचे फळ काढून घेऊन तिला मुळापासून उपटले जाईल काय? तिची सर्व नवीन पालवी वाळून जाईल. तिला समूळ उपटण्यासाठी ना मजबूत हात लागणार ना पुष्कळ लोकांची गरज लागणार.
तिला लावले तर आहे, पण तिची भरभराट होईल काय? पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती पूर्णपणे वाळून—ज्या ठिकाणी वाढली त्याच ठिकाणी ती वाळणार नाही काय?’ ”
“ ‘तुमची आई तुमच्या द्राक्षमळ्यात पाण्याजवळ लावलेल्या द्राक्षवेलीप्रमाणे होती; विपुल पाण्यामुळे ती फलदायी व फांद्यांनी भरलेली होती.
तिच्या फांद्या मजबूत असून, अधिकार्याच्या राजदंडासाठी योग्य होत्या. झाडाच्या दाट पानांच्या वर त्या उंच वाढल्या, तिची उंची व तिच्या पुष्कळ फांद्यांमुळे ती उल्लेखनीय दिसत होती.
परंतु क्रोधामुळे ती समूळ उपटली जाऊन जमिनीवर फेकण्यात आली. पूर्वेकडील वार्याने ती वाळून गेली, तिची फळे गळून पडली; तिच्या मजबूत फांद्या वाळून गेल्या आणि अग्नीने त्या भस्म केल्या.
आता ती वेल वाळवंटात, कोरड्या व तहानेल्या भूमीवर लावली आहे.
तिच्या एका मुख्य फांदीमधून अग्नी पसरला आणि तिचे फळ भस्म केले. अधिकार्याच्या राजदंडासाठी योग्य अशी एकही मजबूत फांदी तिच्यावर राहिली नाही.’ हे विलापगीत आहे आणि विलापगीत म्हणूनच त्याचा उपयोग व्हावा.”
“मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत.
माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी करतात.
जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आधी शुद्ध झालाच आहात.
म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.