नीतिसूत्रे २०:१-६
१
मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत.
२
राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा भयप्रद आहे; जो त्याचा राग जागृत करतो त्याची प्राणहानी होते.
३
कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे, परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो.
४
आळशी निर्धारित ऋतूमध्ये नांगरणी करीत नाहीत; म्हणून हंगामाच्या वेळी शोधून त्यांना काहीही मिळणार नाही.
५
मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत, परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो.
६
पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात, परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल?
Settings