Skip to content
स्तोत्रसंहिता ४९:५-१२

स्तोत्रसंहिता ४९:५-१२

संकटकाळी मला भिण्याचे कारण काय, जेव्हा फसवणूक करणारे दुष्ट मला वेढतात—
जे आपल्या संपत्तीवर भिस्त ठेवतात, आणि आपल्या धनाच्या संपन्नतेची फुशारकी मारतात?
कोणत्याही व्यक्तीस इतर व्यक्तीचा उद्धार करण्यासाठी खंडणी भरता येत नाही; किंवा त्याच्या जिवाची खंडणी तो परमेश्वराला भरून देऊ शकत नाही.
कारण मनुष्याच्या जिवाच्या खंडणीचे मोल फार मोठे आहे, कोणतेही पैसे कधीही पुरेसे होत नाहीत—
जेणेकरून त्यांनी सर्वदा जिवंत राहावे आणि कबरेचा अनुभव त्यांना येऊ नये.
१०
सुज्ञ माणसेही मरण पावतात, हे प्रत्येकाला दिसते; मूर्ख व अज्ञानी माणसेही मरण पावतात, ते आपली संपत्ती दुसर्‍यांसाठी ठेवून जातात.
११
त्यांनी आपल्या जमिनीला स्वतःची नावे दिलेली असली, तरी त्यांची थडगीच त्यांची कायमची घरे होतील; ती त्यांची पिढ्यान् पिढ्या वसतिस्थाने असतील.
१२
परंतु लोकांची संपत्ती कितीही असली, तरी ते नाशवंत पशूसारखेच आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options