मुख्य मजकुरावर जा
स्तोत्रसंहिता १०७:४-९

पहिले उदाहरण: वाळवंटातील भटके

स्तोत्रसंहिता १०७:४-९
काहीजण उजाड प्रदेशातून भटकत होते, त्यांना स्थावर होण्यासाठी शहराकडे जाणारा मार्ग सापडत नव्हता.
भूक व तहान यांनी ते व्याकूळ झाले होते, ते दुर्बल होऊ लागले होते.
त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.
त्यांनी त्यांना एका अचूक मार्गाने चालविले, आणि वस्ती करण्यास नगरात आणले.
याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.
कारण ते तहानेल्यास तृप्त करतात, आणि भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options