Skip to content
यिर्मयाह ४९:२३-२७

यिर्मयाह ४९:२३-२७

२३
दिमिष्क विषयी: “हमाथ व अर्पाद ही शहरे भीतीने घाबरी झाली आहेत, कारण त्यांना वाईट बातमी समजली आहे. ते निराश झाले आहेत, एखाद्या खवळलेल्या समुद्रागत अस्वस्थ झाले आहेत.
२४
दिमिष्क दुर्बल झाले आहे, पलायन करण्यासाठी ती माघारी फिरली आहे आणि भयाने त्यांना धडकी भरली आहे; जशा प्रसूत होणार्‍या वेदना स्त्रियांना घेरतात, त्याप्रमाणे वेदना व पीडा यांनी त्यांना घेरले आहे.
२५
जी नगरी मला प्रसन्न करते, त्या प्रसिद्ध नगरीस टाकून देण्यात का आले नाही?
२६
निश्चितच तुझे तरुण रस्तोरस्ती मरून पडतील; तुझे सर्व सैनिक त्या दिवशी निःशब्द केल्या जातील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
२७
“आणि मी दिमिष्कच्या सीमेवर अग्नी पेटवेन व तो अग्नी बेन-हदादचे राजवाडे जाळून टाकील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options