१
जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते, परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय.
२
नीतिमान लोकांना याहवेहची कृपा प्राप्त होते, पण दुष्ट योजना रचणार्या मनुष्याला याहवेह दोषी ठरवितात.
३
दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही, परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही.