Skip to content
मत्तय २५:१-८

मत्तय २५:१-८

“त्यावेळी स्वर्गाचे राज्य, आपआपले दिवे घेऊन वराला सामोर्‍या जाणार्‍या दहा कुमारींसारखे होईल.
त्यांच्यापैकी पाच मूर्ख होत्या व पाच शहाण्या होत्या.
मूर्ख कुमारींनी दिव्यांबरोबर आपले तेल घेतले नाही.
शहाण्यांनी मात्र दिव्यांबरोबरच आपआपल्या कुपीत तेलही घेतले.
वराला येण्यास उशीर लागला म्हणून सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या.
“मध्यरात्री, ‘वर येत आहे; त्याच्या स्वागतासाठी बाहेर यावे!’ अशी हाक त्यांच्या कानी आली.
“मग सर्व कुमारी गडबडीने उठल्या आणि त्यांनी दिवे तयार केले.
मूर्ख कुमारी शहाण्या कुमारींना म्हणाल्या, ‘तुमच्या तेलामधून आम्हाला थोडे द्या; कारण आमचे दिवे विझू लागले आहेत.’
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options