Skip to content
शास्ते १५:१-८

शास्ते १५:१-८

काही दिवसानंतर गहू कापण्याच्या हंगामात, शमशोनाने एक शेळी घेतली आणि आपल्या पत्नीला भेटायला गेला. तो म्हणाला, “मी माझ्या पत्नीच्या खोलीत जात आहे.” पण तिचे वडील त्याला आत जाऊ देईना.
“मला खात्री होती की तू तिचा तिरस्कार करतोस,” तो म्हणाला, “मी तिला तुझ्या सोबत्याला दिले. तिची धाकटी बहीण अधिक आकर्षक नाही का? तिच्याऐवजी हिला घेऊन जा.”
शमशोन त्यांना म्हणाला, “यावेळी मला पलिष्ट्यांवर चालून जाण्याचा अधिकार आहे; मी त्यांना शिक्षा करेन.”
म्हणून शमशोन बाहेर पडला आणि त्याने तीनशे कोल्हे पकडले आणि जोडीजोडीने त्यांच्या शेपट्या एकत्र बांधल्या. प्रत्येक दोन शेपट्यांच्या जोडीमध्ये त्याने एकएक मशाल बांधली,
मशाली पेटविल्या आणि कोल्ह्यांना पलिष्ट्यांच्या उभ्या पिकात मोकळे सोडले. त्यांनी द्राक्षमळे आणि जैतुनाचे मळे आणि धान्य जाळून टाकले.
तेव्हा पलिष्ट्यांनी विचारले, “हे कोणी केले?” त्यांना सांगण्यात आले, “हे तिम्नाहचा जावई शमशोनाने केले, कारण त्याची पत्नी त्याच्या सोबत्याला देण्यात आली आहे.” तेव्हा पलिष्टी लोक आले व त्यांनी तिला व तिच्या पित्याला जाळून टाकले.
शमशोन त्यांना म्हणाला, “आता तुम्ही याप्रकारे वागला आहात म्हणून, मी अशी शपथ घेतो की तुमच्यावर सूड घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही.”
तेव्हा अतिशय क्रूरतेने त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी अनेकांना ठार केले. त्यानंतर तो खाली गेला आणि एटाम खडकातील गुहेत राहू लागला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options