१
याहवेह असे म्हणतात: “न्यायीपणाने वागा, जे योग्य तेच करा, कारण माझे तारण अगदी हाताशी आलेले आहे आणि माझे नीतिमत्व लवकरच प्रगट होणार आहे.
२
जो शब्बाथाच्या दिवसास अपवित्र न करता त्याचे पालन करतो, अयोग्य गोष्ट करण्यापासून स्वतःला आवरतो, या सर्व गोष्टींवर अढळ राहतो, जो असे वागतो, तो मनुष्य धन्य होय.”