विलापगीत ३:२७-३९
२७
मनुष्याने त्याच्या तारुण्यात जू वाहणे त्याच्या हितासाठी आहे.
२८
कारण ते याहवेहनेच त्याच्यावर लादले आहे म्हणून त्याने एकांतात शांत बसावे.
२९
त्याला त्याचे मुख धुळीत पुरू दे— तरी आशा कायम असेल.
३०
जे त्याला चपराक मारतात, त्यांच्यापुढे त्याने दुसरा गालही करावा, आणि तो सर्व अपमानाने भरून जाऊ दे.
३१
कारण प्रभू कोणाचाही कायमचा त्याग करत नाहीत.
३२
जरी त्यांनी त्याला दुःख दिले, तरी ते करुणा करतात, त्यांची महान प्रेमदया अथांग आहे.
३३
ते स्वखुशीने माणसांना पीडा देत नाहीत व त्यांना दुखवित नाहीत.
३४
जगातील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडवून चिरडणे,
३५
परमोच्चांनी दिलेले हक्क त्यांच्यापासून हिरावून घेणे,
३६
कोणा मनुष्याची न्याय-वंचना करणे— या गोष्टी प्रभू बघणार नाहीत काय?
३७
प्रभूने परवानगी दिल्याशिवाय बोलून तसे घडविण्याचे सामर्थ्य कोणामध्ये आहे?
३८
अनिष्ट व इष्ट ही दोन्हीही परमोच्चाच्या मुखातून येत नाहीत काय?
३९
आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी?
Settings